विवेक जागर संस्था – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नवी मुंबई जिल्हा कवी संमेलन – २०२५
विषय : वैज्ञानिक दृष्टिकोन
शीर्षक : प्रश्नांच्या ज्योती
विज्ञान म्हणजे फक्त सूत्र नव्हे,
तो विचारांचा — जिवंत श्वास आहे.
प्रश्न विचारणं — हीच खरी प्रार्थना,
आणि शोध घेणं — म्हणजे साधना!
भयाच्या सावलीत — जेव्हा श्रद्धा थरथरते,
तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन दिवा पेटवतो.
तो कुजबुजतो —
“विश्वास ठेवा... पण कारणही जाणून घ्या!”
आकाशाकडे पाहणं पुरेसं नाही,
त्या ताऱ्यांचं मोजमाप समजून घ्या.
देव दिसला नसेल... पण गुरुत्वाकर्षण जाणवतं,
हेच तर ज्ञानाचं सौंदर्य आहे!
अंधार फोडणारा प्रकाश नाही,
तर विचार आहे... प्रयोग आहे!
जगाला चालना देणारी ती जिज्ञासा,
हाच माणसाचा — खरा धर्म आहे!
श्रद्धेच्या पलीकडचं सत्य शोधताना,
भीती नाही — बुद्धी उभी राहते!
विज्ञान शिकवतं —
“चुकलं तरी चालेल... पण शोध थांबवू नकोस!”
शोध थांबवू नकोस, विचार थांबवू नकोस!
कारण — या ज्योतीतच माणूस उजळतो,
आणि विवेकाचा सूर्य उगवतो...
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: २५/१०/२०२५ वेळ : १०:४४
Post a Comment