कविता — शब्द शून्य सोबती
कधी वाटतं —
ज्याच्यासोबत काळ थांबावा,
त्याचं अस्तित्वच
क्षणार्धात विरून जातं...
ज्यांनी मनाला,
सावलीसारखी साथ दिली,
तेच एक दिवस
श्वासातून हरवून जातात...
प्रेम, शब्द, स्पर्श,
क्षणांचे कोवळे स्पंदन—
सगळं सामावून घेणारं
एक हसू — तेच शेवटचं ठरतं...
ज्यांना आपण देवदूत समजतो,
ते खरंच कधीतरी
काही कळण्याआधीच
देवांप्रमाणेच
अलिप्त होऊन निघून जातात...
त्यांची आठवण
आठवणीतच राहते,
शब्दांच्या पलिकडची,
स्पर्शालाही न सापडणारी...
आणि मग उरतो तो —
एक धूसर चेहरा,
त्यांच्या हास्याचं प्रतिबिंब,
मनाच्या आडवळणावर उसवलेलं...
"दुरावा" ही
कधीकधी शेवटची भेट असते,
आणि "आठवण" —
एकटेपणाच्या वाटचालीतील
शब्द शून्य सोबती...
@गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०४/०८/२०२५ वेळ : ०८;०१
Post a Comment