*स्पर्धेसाठी*
*शब्दसेतू साहित्य मंच, पुणे*
आणि
*मोरणा कवीकट्टा समूह, पश्चिम महाराष्ट्र*
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*पश्चिम महाराष्ट्र काव्य करंडक काव्यलेखन स्पर्धा २०२५*
*फेरी क्रमांक : ४*
*विषय : जिव्हाळा (भावगीत - पंचपदी)*
*शीर्षक : नातं*
हृदयाच्या ओंजळीत, गूढ भावना साचल्या,
सुख-दु:खांच्या लाटांत, शांत लाभला जिव्हाळा ।धृ।
आठवणींच्या सरींत, चित्त ठेवलेलं शांत,
स्पर्शाविना उमगतं, शब्दांवाचून अनंत।
दूर असून मनात, नातं घट्ट जुळलेलं,
कधी कधी दुखावतं, प्रेम फुलत राहिलं,
भावनांत वसलेला, सच्चा श्वासात जिव्हाळा ।१।
नजरेच्या पाकळ्यांत, वसे हसरा गजरा,
फुलांतून दरवळे, गंध तोच ओळखीचा।
ओलसर हलकासा, आठवांत गुंतलेला,
मन खोलं कुठंतरी, जातो गुंतवत त्यांचा,
शब्दांत न मावणारा, हलकासा गंधभुला ।२।
वाऱ्याच्या झुळुकेवर, निनादतं एक गाणं,
जसं झाडांच्या साक्षीनं, बोलतं अबोल नातं।
चंद्रकिरण सांडती, तरी अस्पष्ट प्रकाश,
अंतरीच्या काठावर, नवा गूढसा आभास,
अश्रूंमध्ये मिसळला, अनामिक स्वरभुला ।३।
*©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई*
दिनांक : १५/०६/२०२५ वेळ : २१:३३
Post a Comment