कविता - बंधन की वरदान?

कविता - संस्कार – बंधन की वरदान?

संस्कार शिकवतात, 

गप्प बसायला, 

दुःख लपवायला, 

हसऱ्या मुखवट्याआड वेदना दडवायला...

समाज सांगतो – 

"सहन कर, 

शांत रहा, 

संस्कृती जप, 

मर्यादा पाळ..."

पण विचारतं का कुणी 

या बंधनात अडकलेल्या मनाला? 

त्या न बोललेल्या वेदनांना? 

या घायाळ श्वासांना?

माणूस शिकतो – 

ह्रदय पिळवटून दुःख सहन करायला, 

नात्यांच्या ओझ्यात स्वतःला हरवायला, 

पिढ्यान् पिढ्या तोच वारसा पुढे न्यायला...

संस्कार, परंपरा, शिस्त – 

खरंच वरदान आहेत का? 

की न दिसणाऱ्या बेड्या, 

ज्यात पिढ्यान् पिढ्या 

हसत हसत अडकत जातात?


©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 

दिनांक : २४/०३/२०२५ वेळ : ०७:१४

Post a Comment

Previous Post Next Post