कविता – निसर्गाशी सुसंवाद


कविता – निसर्गाशी सुसंवाद

वारा स्पर्शता, चित्त हेलावते
सागर लाट, कानी कुजबुजते

आकाश निळे, गगन आत्मा रंगवते
पाखरांचे सुर, अंतःकरणात उमलते

झाड सावली, क्षण जपते मृदुते
फुल रंग स्वप्नात, छटा वाढवते

भूमीच्या कुशीत श्वास, घेतो मी मधुर
वनाचा अनुभव, उलगडतो सविस्तर

चंद्र शीतल रात्री, जगास मोहवतो
तारे गातात सूर, भाव मनास भिडतो

पाऊस थेंबांत, गोड जीवन सांगतो
मेघ रिमझिम, हृदयाला शांती देतो

नदी प्रवाह, जीवन गती दाखवतो
लहरीत स्वर, आनंद किती गोड देतो

फुलाची मृदुता, पाकळ्यांची कोमलता
वृक्ष गंध माती, सुगंध दरवळता

चित्त प्रतिबिंब, आत्मा ओघळतो
शब्दांशिवाय संवाद, अंतःकरणात मिसळतो

श्वास लयीत प्राण, निसर्ग बोलतो
रंग, सूर, हलका स्पर्श अनुभवतो

आत्मा जागवताना, जीव प्रबोधन अनुभवतो
निसर्ग गोड संवादात, चित्त एकाग्र करतो

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : २३/०९/२०२५ वेळ : २१:२४

Post a Comment

Previous Post Next Post